Posts

Showing posts from November, 2021

आठवणी १० वी च्या.. !!!

Image
  दिवसच तसे होते कोण पोरग एकाद्या पोरीला बोलला की मारुसतो धुतला म्हणून समजा. आज तब्बल १२-१३ वर्षांनी भेट झाली सर्वांची, नेमकं काय बोलायचं? कसं बोलायचं? काही कळत नव्हतं. मेंदूला जरा जास्तच ताण पडत होता बऱ्याच लोकांचे चेहरे ओळखू तर येत होते पण नावं मात्र आठवत नव्हते. कोण कोणाला हळूच विचारात होत अग तो कोण आहे ग?, अरे ती कोण आहे रे? पण शेवटी परत शाळेत असल्यासारखे एकमेकांना ओळखू लागले. या ओळखी अश्याच स्मरणात राहण्यासाठी आपल्याला भेटायला पाहिजे. तसंही लोक म्हातारे होताना विसरायला लागतात. या आठवणी अश्याच ताज्या राहायला पाहिजेत. माहीत नव्हतं तेंव्हा असं भेटावं लागलं, त्या जुन्या आठवणींना अश्या प्रकारे सामोरं जावं लागतं. सकाळी सकाळी लवकर शाळेत येऊन कोण कुणाचा डेस्क उचलून घेऊन जातो, तर कोणी आपला डेस्क कुणाच्या तरी दप्तर ने पुसून काढतो. इंग्रजी च्या तासाला मुद्दामहून मराठीत एक साथ नमस्ते म्हणायचं आणि सगळ्या वर्गाने बटुळे सरांचा मार खायचा. यात मुली मात्र वाचल्या. मराठीचे वणवे सर आज आपल्यात नाहीत मात्र सकाळी राष्ट्रगीताच्या वेळी पेटीतून येणारे शब्द अजूनही कानात घुमतात. हिटलर म्हणून प्रसिद्ध असल...

“शिरसवाडी”

Image
पुस्तक बाजारात मिळत नव्हतं, ट्विटर वर स्पेस मध्ये असाच विषय निघाला आणि अमर पवार सरांनी त्यांच्याकडे हे पुस्तक आहे आणि ते मला हे पुस्तक पाठवतो बोलले. पुस्तक माझ्या हातात आलं, पुस्तकाबद्दल खूप ऐकलं होतं. हवा तसा वेळही मिळत नव्हता पण भेट मिळलेल पुस्तक आणि कोणीतरी आपल्याला आवर्जून पाठवलेलं पुस्तक तर वाचायलाच पाहिजे. कालचा दिवस, मित्राची अभियांत्रिकी सेवेची मुलाखत विधानभवन पुणे ला, ठरल्याप्रमाणे मी त्याच्या सोबत गेलो. तिथं गेल्यावर मी काय करणार म्हणून “शिरसवाडी” बॅग मध्ये टाकलं. उगाच मोबाईल मध्ये टाईमपास करण्यापेक्षा वाचू थोडाफार पुस्तक असा विचार केलेला. सोबतचा फोटो विधानभवन पुणे इथला आहे. पुस्तक काल सकाळी वाचायला घेतलं आज दुपारी संपलं. एकदा लेखक किती छान कथा लिहू शकतो आणि वाचणाऱ्याला आपल्या लेखनात गुंतवून ठेवू शकतो याच उत्तम उदाहरण म्हणजे गणेश बर्गे सर. पुस्तक वाचत असताना मी किती वेळा रडलो? मी किती वेळा भावुक झालो? मी किती वेळा आनंदी झालो? मी किती वेळा गहिवरून गेलो होतो? हे मोजू शकलो नाही. एक वेळ तर असं वाटलं आपण चुकीच्या ठिकाणी बसून तर पुस्तक वाचत नाहीत ना? कारण विधानभवनात त्या बाकावर बसू...