मित्रा , मी आहे ना...! Everything is fine रे बाबा..! आपल्या आयुष्यात आलेली मित्र नावाची ही माणसं काही उगाच आलेली नसतात....... त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असतं..... त्यांच्याशी काहीतरी ऋणानुबंध जुळलेले असतात..... नाहीतर सव्वाशे करोड लोकसंख्येच्या देशात नेमकी याच व्यक्तीशी आपली ओळख का होते ? याच उत्तर कोणीही देऊ शकत नाही........ जे हे मैत्रीचं नाती तयार होतात ते आपण जीवापाड जपावं...... आपल्या जगण्यासाठी ज्या प्राणवायूची गरज असते तो प्राणवायू म्हणजे ही मैत्री...... रक्ताच्या नात्यांना काही चॉईस नसतो , पण मैत्रीच्या नात्यात तसं नसतं...... It's Mutual Relation..... मन जुळलं , विचार जुळले की मैत्रीचं नातं तयार होत...... जे बंध खूप घट्ट असतात ते कोणाच्याही सांगण्याने किंवा विपरीत परिस्थितीत कधीच तुटत नाहीत...... अथवा खूप वाईट परिस्थितीतुन जात असताना मित्राचे किंवा मैत्रिणीचे “मी आहे ना” हे शब्द संजीवनी सारखे काम करतात...... अगदी प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्ष सोबत असणं खूप सकारात्मक ऊर्जा देणारं असतं...... पैश्यांनी श्रीमंत होणं खूप सोपं आहे हो...... नात्यांनी समृद्ध होणं तितकं...